‘देऊळ बंद’च्या यशानंतर प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय; चित्रपटाचा नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी
मुंबई : ‘देऊळ बंद’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी मोठी सामाजिक भूमिका घेतली आहे. चित्रपटातून मिळालेला सर्व नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
प्रवीण तरडे यांनी सांगितले की, ‘देऊळ बंद’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या यशाचे श्रेय समाजाला आणि प्रेक्षकांना देत चित्रपटाच्या कमाईचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार असून या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रवीण तरडे यांच्या या निर्णयाचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत होत असून, मनोरंजन क्षेत्रातून समाजाप्रती जबाबदारीचे भान जपणारा हा आदर्श उपक्रम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
– उमेश कुलकर्णी9822548429










