नेपाळमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील भाविक सुखरूप नागपुरात; मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
[नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण समन्वयातून भाविकांची सुखरूप भारतात परतण्याची व्यवस्था करण्यात आली.
हे भाविक आज नागपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले असून, त्यानंतर ते आपापल्या गावी रवाना झाले.
संकटाच्या काळात तातडीने मदत उपलब्ध करून देणे, संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधणे आणि भाविकांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 50






