. निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष; संजय राऊत यांचा ९० लाख मते डिलीट केल्याचा आरोप
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष असल्यासारखे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी दावा केला की, भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी आणि ममता बॅनर्जी यांना रोखण्यासाठी मतदार यादीतून तब्बल ९० लाख मते डिलीट करण्यात आली आहेत. या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 83









